Home / महाराष्ट्र / Anjali Damania : शिंदे गटातील मंत्र्यांचा खरातशी नेमका संबंध काय? केसरकरांसह ‘या’ बड्या नेत्यांची नावे रडारवर ;३० सेकंदात ६ मोठे व्यवहार होताना खरात शिंदेंच्या ठाण्यात- नेमका संभंध काय?

Anjali Damania : शिंदे गटातील मंत्र्यांचा खरातशी नेमका संबंध काय? केसरकरांसह ‘या’ बड्या नेत्यांची नावे रडारवर ;३० सेकंदात ६ मोठे व्यवहार होताना खरात शिंदेंच्या ठाण्यात- नेमका संभंध काय?

Anjali Damania : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या खरात प्रकरणात आता दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर...

By: Team Navakal
Anjali Damania
Social + WhatsApp CTA

Anjali Damania : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या खरात प्रकरणात आता दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील काही गंभीर धागेदोरे उघड केले आहेत. या प्रकरणात केवळ प्रशासकीय त्रुटी नसून, सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांचा सक्रिय सहभाग असल्याचा थेट आरोप दमानिया यांनी केला आहे.

बड्या नावांचा समावेश आणि राजकीय कनेक्शन-
अंजली दमानिया यांनी आपल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, खरात प्रकरणाची पाळेमुळे अतिशय खोलवर रुजलेली आहेत. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह इतर अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे जोडली जात आहेत. या संदर्भात बोलताना दमानिया यांनी थेट ‘शिंदे गटा’कडे (शिवसेना – उपख्यमंत्र्यांचा गट) इशारा केला आहे. शिंदे गटातील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे सातत्याने खरातच्या संपर्कात होते, असा दावा त्यांनी पुराव्यांच्या आधारे केला आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह-
या पत्रकार परिषदेतील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे अंजली दमानिया यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील या संशयास्पद व्यक्तीच्या म्हणजेच खरातच्या संपर्कात होते, असे विधान दमानिया यांनी केले आहे. राज्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या वरिष्ठ नेत्यांचे नाव अशा प्रकरणाशी जोडले गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

खरात प्रकरणाचा महास्फोट: सत्ताधारी नेत्यांच्या फोन कॉल्सची ‘कॉल लिस्ट’ सार्वजनिक; शिंदे गटातील मंत्र्यांच्या संशयास्पद संपर्काचा अंजली दमानियांकडून पर्दाफाश-
अशोक खरात प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात एक भीषण वणवा पेटवला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या ‘कॉल डिटेल्स’चा (भ्रमणध्वनी तपशील) जो तपशील सादर केला आहे, त्याने संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील धागेदोरे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिंदे गटा’तील बड्या मंत्र्यांपर्यंत आणि त्यांच्या निकटवर्तीयांपर्यंत पोहोचले असल्याचे पुराव्यांसह उघड झाले आहे.

मंत्र्यांच्या जवळचे ‘दीपक लोंढे’ रडारवर-
अंजली दमानिया यांनी केलेल्या गौप्यस्फोटानुसार, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दीपक लोंढे हे अशोक खरातला सर्वाधिक फोन करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत चक्क तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतः खरातसोबत तब्बल १९ वेळा संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. एखाद्या संशयास्पद व्यक्तीशी एका जबाबदार मंत्र्याचा आणि त्यांच्या खास माणसाचा इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला संपर्क अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.

फोन कॉल्सची धक्कादायक आकडेवारी-
दमानिया यांनी सादर केलेली आकडेवारी खरात आणि सत्ताधारी नेत्यांमधील घनिष्ठ संबंधांची साक्ष देत आहे. खरातला सर्वाधिक फोन करणाऱ्यांमध्ये खालील नावांचा प्रामुख्याने समावेश आहे. यात सर्वाधिक नावे हि शिंदे गटातील आहेत.
१. रुपाली चाकणकर: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत, जे अत्यंत धक्कादायक मानले जात आहे.
२. दीपक लोंढे: (केसरकरांचे निकटवर्तीय) तिसऱ्या क्रमांकावर.
३. बाळासाहेब बोराडे: यांनी खरातला १५६ वेळा संपर्क साधला.
४. सचिन सुंबाळे: खरातसोबत तब्बल १७७ वेळा संवादात होते.

शिंदे गटातील मंत्र्यांचा वेढा-
केवळ दीपक केसरकरच नव्हे, तर शिंदे गटातील इतर मातब्बर नेते देखील खरातच्या संपर्कात होते असा दावा करण्यात आला आहे. यामध्ये दादा भुसे, अविनाश पोटे, आणि महेंद्र शेळके पाटील यांसारख्या नावांचा समावेश असल्याने या प्रकरणाची व्याप्ती केवळ वैयक्तिक संबंधांपुरती मर्यादित नसून ती एक संघटित साखळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे हे सर्व नेते खरातशी कोणत्या कारणासाठी वारंवार चर्चा करत होते, याचे उत्तर आता जनतेला हवे आहे.

सत्तेच्या आशीर्वादाने खरातचे फावले?
अंजली दमानिया यांनी थेट आरोप केला आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर मंत्र्यांचा आणि त्यांच्या पीएंचा (खाजगी सचिव) राबता ज्या व्यक्तीकडे होता, त्याला नक्कीच सत्तेचे कवच लाभले होते. तिसऱ्या क्रमांकावर असलेले लोंढे आणि चौथ्या क्रमांकावर असलेली खरातची स्वतःची पत्नी ‘कल्पना’, यावरूनच या व्यवहारांचे गांभीर्य लक्षात येते.

अजित पवारांच्या घराबाहेरील ‘भानामती’ आणि ठाण्यातील ‘आर्थिक व्यवहार’; अंजली दमानियांचा रोख थेट उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिशेने?
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनापूर्वी, त्यांच्या बारामती येथील निवासस्थानाबाहेर ‘काळी जादू’ किंवा ‘भानामती’चे जे संशयास्पद प्रकार घडले होते, त्या काळात अशोक खरात यांचे नेमके वास्तव्य कुठे होते, याचे धक्कादायक पुरावे दमानिया यांनी सादर केले आहेत. या सर्व घटनाक्रमाचा धागा त्यांनी थेट ठाण्याशी जोडल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

भानामतीचा प्रकार आणि खरात यांचे ठाणे कनेक्शन-
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, १७ तारखेला रात्री जेव्हा बारामतीत अजित पवार यांच्या घराबाहेर अघोरी प्रकार सुरू होते, त्याच वेळी अशोक खरात हे ठाणे शहरात दाखल झाले होते. १८ तारखेला दिवसभर खरात यांचे वास्तव्य ठाण्यातच होते. विशेष म्हणजे, ठाणे पश्चिम येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ते बसून होते असा दावा दमानिया यांनी केला आहे. सकाळी अवघ्या ३४ सेकंदांच्या कालावधीत ६ मोठे आर्थिक व्यवहार (Financial Transactions) देखील झाले. हे व्यवहार नेमके कोणाशी संबंधित होते आणि त्यामागे कोणाचे पाठबळ होते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

ठाणे बालेकिल्ला आणि उपमुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा?
अंजली दमानिया यांनी आपल्या मांडणीत वारंवार ‘ठाणे’ या ठिकाणाचा उल्लेख केल्याने त्यांच्या आरोपांचा रोख नेमका कोणाकडे आहे, हा कळीचा मुद्दा आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. खरात ठाण्यात उपस्थित राहून अघोरी प्रकारांच्या काळात मोठे आर्थिक व्यवहार करत असतील आणि दुसरीकडे खुद्द उपमुख्यमंत्री तसेच त्यांचे निकटवर्तीय मंत्री खरातच्या संपर्कात असल्याचे पुरावे समोर येत असतील, तर या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढते.

अजित पवारांच्या प्रकरणाचे गूढ वाढले-
अजित पवार यांच्या संदर्भात घडलेल्या त्या दुर्दैवी घटनांच्या वेळी खरात आणि सत्ताधारी गोटातील नेत्यांमधील संवाद का वाढला होता, हा आता तपासाचा कळीचा मुद्दा बनला आहे. दमानिया यांच्या दाव्यांमुळे या प्रकरणाला आता केवळ आर्थिक गुन्हेगारीचे स्वरूप उरले नसून, त्याला राजकीय षडयंत्राची आणि अघोरी कृत्यांच्या छटा प्राप्त झाल्या आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या