Home / महाराष्ट्र / ShivSena UBT Melava : नेतृत्वाची हाव नाही, आरोप असतील तर मी पक्षप्रमुख पद सोडायला तयार; पण ही सोन्यासारखी शिवसेना गद्दारांच्या हातात देणार नाही!”; उद्धव ठाकरेंची गर्जना…

ShivSena UBT Melava : नेतृत्वाची हाव नाही, आरोप असतील तर मी पक्षप्रमुख पद सोडायला तयार; पण ही सोन्यासारखी शिवसेना गद्दारांच्या हातात देणार नाही!”; उद्धव ठाकरेंची गर्जना…

ShivSena UBT Melava : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत भावनिक...

By: Team Navakal
ShivSena UBT Melava
Social + WhatsApp CTA

ShivSena UBT Melava : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे वक्तव्य केले. मुंबईतील ऐतिहासिक षणमुखानंद सभागृहात आयोजित या सोहळ्यात बोलताना त्यांनी, “माझ्या नेतृत्वावर होत असलेले आरोप जर तुम्हास खरे वाटत असतील, तर मी या क्षणी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे,” अशी घोषणा केली. आपल्या जागी पक्षातील एखाद्या सामान्य, निष्ठावान शिवसैनिकाला या सर्वोच्च पदावर बसवावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंच्या या अनपेक्षित आणि नाट्यमय आवाहनामुळे सभागृहात उपस्थित हजारो शिवसैनिकांनी तातडीने जागेवर उभे राहून या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आणि त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला.

भाषणातील मुख्य मुद्दे आणि राजकीय भूमिका​उद्धव ठाकरे यांनी आपल्या विस्तृत भाषणात भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिंदे सेना’ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांवर ‘ऑपरेशन टायगर’ सारखे प्रयत्न करून शिवसेना कमकुवत करण्याचा आरोप केला. पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर, ठाकरेंची ही नवीन खेळी पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन चैतन्य निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची (गेमचेंजर) ठरू शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

त्यांच्या भाषणातील प्रमुख पैलू खालीलप्रमाणे आहेत-​

1 पदाची लालसा नाही: उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, त्यांना सत्तेची किंवा पदाची कोणतीही हाव नाही. त्यांनी आठवण करून दिली की, यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्यागही अत्यंत सहजतेने केला होता. जर त्यांना पदाचा मोह असता, तर त्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्व सोडले नसते.​

2 निष्ठावंतांचे आवाहन: गेल्या १२-१३ वर्षांपासून ते संघटनेचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केले की, “माझ्यावरील आरोप जर तुम्हाला मान्य असतील, तर मी पायउतार होईन; मात्र माझी एकच अट आहे की, ही सोन्यासारखी शिवसेना कोणत्याही दरोडेखोरांच्या किंवा गद्दारांच्या हातात जाता कामा नये.”

3 ​आव्हानांना तोंड देण्याची तयारी: अनेक संकटे आणि राजकीय वादळे आली तरीही आपण पहाडासारखे खंबीरपणे उभे राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणूक आणि जनतेचा पाठिंबा​भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील एका अत्यंत भावनिक प्रसंगाचा उल्लेख केला. धाराशिव येथील जाहीर सभेनंतर एका गरीब शेतकऱ्याने आपल्या हक्काचा पैशांचा बटवा खासदाराच्या निवडणुकीच्या खर्चासाठी मदत म्हणून दिला होता.​

निवडणुकीत एका बाजूला पैशांचा महापूर वाहत असताना, आपण केवळ अशा सामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या अथांग प्रेमाच्या बळावर विजय मिळवला आहे. असे असतानाही जे खासदार आता पक्ष सोडून दुसऱ्या गटात सामील होत आहेत, ते आपले हे पाप कोठे फेडतील?” असा रोकडा सवाल त्यांनी विचारला.

गद्दारीच्या इतिहासाचा दाखला​पक्ष सोडून गेलेल्या लोकप्रतिनिधींवर कडक शब्दांत प्रहार करताना त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘खंडोजी खोपडे’ आणि ‘सूर्याजी पिसाळ’ या पात्रांचा संदर्भ दिला. धाराशिवच्या उमेदवाराच्या वक्तव्याचा दाखला देत ते म्हणाले की, “या व्यक्तींना गद्दारी करून ४०० वर्षे उलटून गेली, तरीही त्यांच्या माथ्यावरील गद्दारीचा कलंक पुसला गेलेला नाही. मग आताच्या गद्दारांना हा शिक्का पुसण्यासाठी किती वर्षे लागतील?”

वैचारिक अस्मिता आणि भाजपवर टीकास्त्र​उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या काँग्रेससोबतच्या आघाडीवरून होणाऱ्या टीकेला चोख उत्तर दिले. पक्ष विलीनीकरणाच्या अफवांचा समाचार घेताना ते म्हणाले:

1 ​विलीनीकरणाचा आक्षेप फेटाळला: आम्ही तब्बल ३० वर्षे भाजपसोबत युतीत राहूनही आमचे अस्तित्व टिकवून ठेवले, भाजपमध्ये विलीन झालो नाही; तर आता काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही नेत्यांनी ‘शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल’ या भीतीने पक्ष सोडल्याचा बहाणा केला, तो अत्यंत हास्यास्पद आहे.

2 भाजपच्या विचारसरणीवर आक्षेप: सध्याची परिस्थिती पाहता, उद्या महाराष्ट्र भाजपच ‘मिंधे गटात’ विलीन होतो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. आज घडीला भाजपचे दोन तृतीयांश खासदार हे मूळ पक्षाचे नसून इतर पक्षांतून आयात केलेले आहेत. भाजपमध्ये वैचारिक वांझोटेपण आल्यामुळेच त्यांना सातत्याने आमची माणसे आणि मुले पळवावी लागत आहेत.

लोकसभा निवडणूक आणि नेतृत्व क्षमतेचे प्रत्युत्तर​’ठाकरे मायलेक घराबाहेर पडत नाहीत’ या विरोधकांच्या जुन्या आरोपाचा उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, जर आम्ही घराबाहेर पडून जनतेत गेलो नसतो, सभा घेतल्या नसत्या, तर लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नऊ खासदार निवडून कसे आले असते?

मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक जळफळाट करणाऱ्यांना टोला लगावताना ते म्हणाले की, जेव्हा आमच्यावर घाणेरडे राजकीय आरोप झाले आणि संकटे आली, तेव्हा आमचा बचाव करण्यासाठी यातील एकही जण पुढे आला नव्हता. आता निवडून आलेले खासदार फोडून विरोधकांना नक्की काय साध्य करायचे आहे? सत्तापिपासूपणाची ही कोणती सीमा आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

​एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा​भूतकाळातील घडामोडींवर प्रकाश टाकताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, २०११-१९ च्या काळात जेव्हा भाजपने दगा दिला, तेव्हाच परिस्थितीवश मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती. याच निर्णयामुळे पक्षातल्या काहींचा जळफळाट झाला.

“मातोश्रीने फक्त पक्षाची वाढ करायची आणि सत्तेची सर्व सुकाणू – मग ते मंत्रिपद असो वा मुख्यमंत्रिपद – ती फक्त आम्हालाच हवीत, आमचीच मुले खासदार झाली पाहिजेत, हा काहींचा अट्टाहास होता,” अशा शद्बांत त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली.

वन पार्टी, नो इलेक्शन’: लोकशाहीला गंभीर धोका​भाषणाचा समारोप करताना उद्धव ठाकरे यांनी देशाच्या सद्य राजकीय स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. सध्या ज्या पद्धतीने देशातील राजकारण आणि फोडाफोडी सुरू आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला असून देश अराजकतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या