कराड- तालुक्यातील मसूर गावाच्या पूर्वेला असणार्या घोलपवाडीतील ग्रामस्थ सध्या जवळच्या जंगलातील वन्यप्राण्यांच्या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राणी गावामध्ये घुसू लागल्याने या ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे.
घोलपवाडी हे गाव जंगलाच्या बाजूला आहे. गावाजवळचा डोंगर भाग वनखात्याच्या हद्दीत असल्याने वनविभागाने त्याठिकाणी वन्य प्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या टाक्यांमध्ये पाणी भरलेले नाही. त्यामुळे पाण्याच्या शोधार्थ काही वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. परिणामी या प्राण्यांपासून ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे.