नांदेड- संपूर्ण राज्यात उन्हाचा कडाका जाणवत आहे.त्यात नांदेड जिल्हा तर अक्षरशः होरपळून निघू लागला आहे. काल जिल्ह्यातील कमाल तापमान ४१.४ आणि किमान तापमान २८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
वास्तविक फेब्रुवारीपासूनच नांदेड जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यात मागील आठवड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच कडक ऊन पडत आहे. नागरिक तोंडाला आणि डोक्याला गमचा बांधुन किंवा टोपी घालूनच घराबाहेर पडताना दिसत आहेत. शहरातील श्रीनगर, आनंदनगर,भावसार चौक आदी नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी दुपारी एकनंतर शुकशुकाट दिसत आहे.
दुसरीकडे प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने उद्यापासून तीन दिवस ‘यलो अलर्ट ‘ जारी केला आहे.