बैलगाडी अंगावरून गेल्याने
मजूर महिलेचा जागीच मृत्यू
वर्धा
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथे बैलगाडी अंगावरून गेल्याने एका मजूर महिलेचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
काल सायंकाळी अल्लीपूर परिसरात शेतशिवारातून कामे आटोपून तीन महिला गावाकडे परतत होत्या. त्यांच्या मागून रमेश साखरकर हे शेतकरी बैलगाडी घेऊन गावाकडे येत होते. अचानक बैलगाडीचे एक चाक निखळले आणि बैलांसह बैलगाडी या तिन्ही महिलांच्या अंगावरून गेली. या अपघातात मनीषा गजानन भुसारी (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. कालिंदा गवळी (५५) आणि माया बंडू नागतोडे (४५) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.