नवी दिल्ली – राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रा सध्या विश्रांतीवर असून 2 मार्च रोजी ती पुन्हा राजस्थानच्या ढोलपुर प्रांतातून मार्गस्थ होईल आणि त्याच दिवशी मध्य प्रदेश राज्यात प्रवेश करेल अशी माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली. त्यानंतर चार दिवस ही यात्रा मध्य प्रदेशातच असेल. राहुल गांधींना नवी दिल्लीत महत्वाच्या बैठकांना हजर रहायचे असल्याने सोमवारपासून यात्रेने विराम घेतलेला आहे.