जयपूर
राजस्थानच्या झालवार जिल्ह्यात भरधाव ट्रकची व्हॅनला धडक दिल्याने काल रात्री ९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहेत. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला होता. त्यानंतर ट्रक चालकला ताब्यात घेण्यात आले.
मध्य प्रदेशातील डुंगरी येथे लग्न समारंभात सहभागी होऊन दुगरगाव येथील घरी परतत असताना १० जणांच्या मारुती व्हॅनला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातानंतर तेथील लोकांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पोलिसांनी ७ जणांना उपचारासाठी अकलेरा रुग्णालयात दाखल केले. त्यातील सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकावर अद्याप उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.