मुंबई- उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर होताच आज दुपारी त्या मातोश्रीवर पोहोचल्या. त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणारच, माझे मत तुम्हाला देणार अशा शब्द दिला. या भेटीदरम्यान विनोद घोसाळकर हेदेखील मातोश्रीवर उपस्थित होते. कालच वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.