ठाणे – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ठाणे विभाग दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील होळीसाठी सज्ज झाला आहे.यावेळी ठाणे जिल्ह्यातून तब्बल १२६ जादा गाड्या कोकणासाठी सोडल्या जाणार आहेत. त्यामध्ये आरक्षणाच्या १०६ तर ग्रुपच्या २० गाड्यांचा समावेश आहे.
यंदा १२ गाड्या वाढवण्यात आल्या आहेत.तसेच ठाणे-२ या एकाच आगारातून सर्वाधिक ३९ जादा गाड्या सोडण्यात येणार आहे.येत्या २२ ते २६ मार्च दरम्यान गाड्यांचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात २२ मार्चला गाड्या सोडल्या जातील. येत्या २४ मार्चला होळी आणि २५ मार्चला धुळवड आहे.या आठवड्यात ठाणे -१ आगारातून २९, ठाणे-२ आगारातून- ३९,कल्याण आगारातून- २३ आणि विठ्ठलवाडी आगारातून ३१ अशा १२२ गाड्या सोडण्यात येणार आहेत.या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण सुरू झाले आहे.