राज्यात भीती व भ्रष्टाचारामुळे पक्ष फुटले ! खासदार संजय राऊतांचे प्रत्युत्तर

MP Sanjay Raut

मुंबई – राज्यात भय आणि भ्रष्टाचारामुळे पक्ष फुटल्याचे वक्तव्य उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेना पक्षफुटीवरून (party split) गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. हे आरोप संजय राऊत यांनी फेटाळले.

उबाठा खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आरोपांवर म्हणाले की, तुम्ही पळून गेलेल्या डरपोक माणसाचे आरोप कुठे मनावर घेता? शिवसेना हायजॅक (hijacked)केली आहे. आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही निष्ठावंतांची आहे. ती आजही ठाकरे यांच्याच ताब्यात आहे. हे गद्दार लोक शिवसेना हायजॅक करणार होते. त्यांना अखेर पळून जावे लागले. भय आणि भ्रष्टाचारामुळे ते सर्व पळून गेले. ज्याना गद्दारीचे शेण खायचे होते, ज्यांना पैसा आणि सत्तेची चटक लागली, ज्यांच्यावर ईडी (ED), सीबीआय (SBI), पोलिसांचा दबाव होता अशा लोकांना थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते थांबत नाही. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी चर्चा केली. मी स्वतः त्यावेळी अनेक बैठकांना उपस्थित होतो. परंतु प्रत्येकाचे दुखणे वेगळे होते. हे मला माहीत आहे.
गुलाबराव पाटील (Gulabrao patil)यांच्या सारख्यांच्या खात्यामध्ये चाळीस-पन्नास हजार कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे त्यांना ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते. या भीतीने ते थरथर कापत होते. त्यांना वाटत होती की, आपल्याला अटक होईल असे गुलाबराव पाटील यांनीच सांगितले होते. हा भ्रष्टाचाराचा कॅन्सर आहे. त्याला तुम्ही काहीही करू शकत नाही.
गेले काही दिवस आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगणार्‍या आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत राऊत म्हणाले की,ते आमचे सहकारी आणि उबाठाचे प्रमुख नेते आहेत. ते कडवट शिवसैनिक असून त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. मागील काळात पक्ष वाढीसाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे.ते आम्हाला सर्वांना ते प्रिय आहेत. आता त्यांची भूमिका वृत्तपत्रांमधून मी वाचली आहे. ते ज्यावेळी मुंबईला येतील त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्याशी नक्कीच चर्चा करतील. त्यांच्यावर पक्षाने अनेकदा जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. त्याच्या मनातील वेदना आम्ही नक्कीच समजून घेऊ. कारण ते आमचेच आहेत.