हिंदी मुद्यावरून विधानभवनाबाहेर सत्ताधारी व विरोधकांची घोषणाबाजी

Sloganeering by Ruling and Opposition Parties Outside the Vidhan Bhavan Over Hindi Issue

Sloganeering by Ruling and Opposition Parties Outside the Vidhan Bhavan Over Hindi Issue

मुंबई – राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या (monsoon session) पहिल्या दिवशी विधानभवन(vidhanbhavn) इमारतीबाहेर सत्ताधारी(state goverment ) आणि विरोधी(opposition) या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सत्ताधारी पक्षाने होय मी खोटे बोललो, कमॉन किल मी असा मजकूर असलेले पोस्टर हातात घेऊन(Shinde MLA) शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना(UBT) उबाठा पक्षाला डिवचले.तर ठाकरे गटाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभे राहून हिंदीच्या मुद्यावरून महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी केली. (marathi & hindi issue)

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री(CM) असताना स्वीकारला आणि नंतर सत्तेतून गेल्यानंतर ते हिंदी सक्तीविरोधात आंदोलन करत असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला. यावेळी मंत्री भरत गोगावले,मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मनीषा कायंदे यात सहभागी झाले होते. त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी हातात टाळ घेऊन घोषणाबाजी केली. अभिमान मराठीचा असे लिहिलेली पोस्टर आणि मी मराठी अशा टोप्या घालून हिंदी सक्तीच्या अध्यादेश सरकारला रद्द करावा लागल्याच्या घोषणा दिल्या. याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा, शक्तिपीठ महामार्गाला विरोध या मुद्द्यांवरून सरकारवर आरोप केले. याचवेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधिमंडळात दाखल झाले. तेव्हा विरोधकांनी त्यांनाही मी मराठी लिहिलेली टोपी घातली. बावनकुळेंनीही तिचा हसतमुखाने स्वीकार केला.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर, श्रद्धा टापरे आणि रोहिदास देशमुख यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडण्यात आला. सभागृहाने हा शोकप्रस्ताव मंजूर केल्यानंतर आजचे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माहिती देताना सांगितले की, उद्या सकाळी ११ वाजता कामकाजाला पुन्हा सुरुवात होईल.