Garib Rath Fire : पंजाबमधील (Panjab)अमृतसरहून बिहारमधील (Bihar) सहरसा येथे जाणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसमध्ये (Garib Rath) शनिवारी पहाटे भीषण आग लागली. या ट्रेनचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. आज सकाळी पंजाबमधील (Panjab) सरहिंद रेल्वेस्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर अंबाला स्टेशनच्या एक किलोमीटर मागे असताना ही मोठी दुर्घटना घडली. ट्रेनच्या एका डब्यातून धूर निघत असल्याचे निदर्शनात आले. ते पाहून ट्रेन थांबवण्यात आली. ही आग ट्रेनच्या तीन डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली. ट्रेन थांबताच प्रवाशांनी थेट बाहेरचा रास्ता गाठला. या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरुप असलायची माहिती आहे.
आगीचं मुख्य कारण काय?
सरहिंद जीआरपी एसएचओ रतन लाल यांनी या घटनेची अधिक माहिती देताना सांगितलं की ट्रेनच्या एका डब्यातून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचं पाहिलं. त्यानंतर तातडीने ट्रेन थांबवण्यात आली. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ट्रेन थांबताच प्रवासी पटापट ट्रेनमधून उतरले. या आगीमुळे ट्रेनचे तीन डबे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. मात्र, आगीचं कारण अद्याप समोर आले नाही. आम्ही आग लागण्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली. लवकरच याबाबत निवेदन जारी केलं जाईल. त्यात आगीचं कारणही स्पष्ट केलं जाईल.

रेल्वे मंत्रालयाने देखील या बाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात पंजाबमधील सरहिंद स्टेशनजवळ आज सकाळी १२२०४ अमृतसह सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्यात यश मिळाले आहे. पंरतु या दुर्घटनेत एक महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली आहे. या महिलेला जवळच्याच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व तिच्यावर अधिकचे उपचार चालू आहेत.
हे देखील वाचा – ST Bus News : लालपरीच धक्कादायक वास्तव..