Dhurandhar Movie: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या मुख्य भूमिकेत असलेल्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने जागतिक स्तरावर 1,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, या यशानंतर आता एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. पाकिस्तानातील कराचीमधील ल्यारी भागातील रहिवाशांनी चित्रपटाच्या कमाईत आपला वाटा असावा, अशी अजब मागणी लावून धरली आहे.
काही स्थानिकांनी तर चित्रपटाच्या एकूण कमाईपैकी 80 टक्के हिस्सा ल्यारीच्या विकासासाठी देण्याचे आवाहन केले आहे.
नेमकी मागणी काय आहे?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये ल्यारीचे रहिवासी असा तर्क मांडत आहेत की, ‘धुरंधर’ चित्रपटात त्यांच्या भागाचे नाव आणि पार्श्वभूमी वापरली गेली आहे. त्यामुळे या व्यावसायिक यशाचा फायदा स्थानिक समुदायाला मिळणे आवश्यक आहे. “जर भारताने पैसे दिले, तरच आमच्या भागातील रस्ते आणि पायाभूत सुविधा सुधारू शकतात,” असे एका रहिवाशाने म्हटले आहे. शेकडो कोटी रुपये सार्वजनिक कल्याणासाठी खर्च केले जावेत, असे मत या लोकांनी व्यक्त केले आहे.
"Aditya Dhar ji, attention please…" 🤣🤣
— Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) March 27, 2026
Dhurandhar 2 has earned over ₹1000 crore
so far. Now, people of LYARI are demanding a 50% share for their development. 🤣
Pakistan govt is not developing Lyari despite getting billions in loans from US and IMF. pic.twitter.com/gVaHP3R39W
ल्यारीच्या रहिवाशांचा दावा काय?
रहिवाशांच्या मते, या चित्रपटाने ल्यारीची ओळख आणि तिथल्या परिस्थितीचे भांडवल करून मोठी कमाई केली आहे. या भागातील खराब रस्ते आणि सुविधांचा अभाव अधोरेखित करत त्यांनी असा दावा केला की, कथेतील खरेपणा हा ल्यारीच्या वास्तवावर आधारित आहे. त्यामुळे 70 ते 80 टक्के वाटा हा त्यांचा हक्क असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
काय आहे ‘धुरंधर: द रिव्हेंज’ची कथा?
आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट एका भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याची कथा सांगतो, जो ल्यारीमधील टोळीयुद्धाच्या जाळ्यातून मार्ग काढत आपली मोहीम फत्ते करतो. या चित्रपटात अर्जुन रामपाल, आर. माधवन, अक्षय खन्ना, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांसारख्या तगड्या कलाकारांच्या भूमिका आहेत. याआधीच्या भागालाही जगभरात 1,300 कोटींची मोठी पसंती मिळाली होती.
चित्रपट निर्मात्यांची भूमिका
या सर्व मागण्यांवर आतापर्यंत दिग्दर्शक आदित्य धर किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या विषयावरून मोठी चर्चा रंगली असून, चित्रपटात दाखवलेल्या भागांना किंवा समुदायांना आर्थिक नफ्यात वाटा द्यावा का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.










