Home / देश-विदेश / Sonam Wangchuk : जंतर-मंतरवरून सक्तीने हटवल्यास घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन; उपोषणाच्या १३ व्या दिवशी सोनम वांगचुक यांचा सरकारला गंभीर इशारा

Sonam Wangchuk : जंतर-मंतरवरून सक्तीने हटवल्यास घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन; उपोषणाच्या १३ व्या दिवशी सोनम वांगचुक यांचा सरकारला गंभीर इशारा

Sonam Wangchuk : ‘नीट-यूजी’ (NEET-UG) सह देशातील विविध राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराविरोधात राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर...

By: Team Navakal
Sonam Wangchuk :
Social + WhatsApp CTA

Sonam Wangchuk : ‘नीट-यूजी’ (NEET-UG) सह देशातील विविध राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराविरोधात राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन सलग २१ व्या दिवशीही सुरूच राहिले. या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देत ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज १३ वा दिवस पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, वांगचुक यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “मी येथे माझ्या संपूर्ण स्वेच्छेने आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहे; जर मला इथून बळजबरीने हटवण्याचा प्रयत्न झाला, तर ते भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन ठरेल,” असे वांगचुक यांनी निक्षून सांगितले.

“हाडे दिसू लागली तरी माझ्यात ऊर्जा कायम; लोकशाहीत आंदोलन करणे हा उपकार नाही”
आपल्या प्रकृतीविषयी आणि भूमिकेविषयी बोलताना सोनम वांगचुक म्हणाले, “आज माझ्या उपोषणाचा १३ वा दिवस असून माझी तब्येत स्थिर आहे. आता माझ्या शरीराने या उपोषणाशी जुळवून घेतले असल्याने मला भुकेची जाणीव होत नाही. शरीरातील चरबी पूर्णपणे वितळली असून स्नायू कमालीचे घटले आहेत, त्यामुळे माझी हाडे आता स्पष्ट दिसू लागली आहेत; तरीही माझ्या मनात आणि शरीरात विद्यार्थ्यांसाठी लढण्याची ऊर्जा कायम आहे. मला या आंदोलनस्थळावरून हटवण्याचा प्रयत्न का केला जात आहे, हे मला समजत नाही. मी इथे कोणाच्याही दबावाशिवाय, स्वतःच्या इच्छेने आलो आहे आणि माझ्या जीवाला कोणताही धोका नाही.”

प्रशासकीय कारवाईचा निषेध करताना ते पुढे म्हणाले, “आम्हाला जबरदस्तीने इथून हलवले गेले, तर तो आमच्या लोकशाही अधिकारांवर घाला असेल. संपूर्ण जग भारताच्या लोकशाहीकडे आणि इथल्या व्यवस्थेकडे पाहत आहे. राज्यघटनेच्या ‘कलम १९’ अंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा आणि आपले मत मांडण्याचा मूलभूत अधिकार मिळाला आहे. हा कोणाचा आमच्यावर उपकार नाही, तर आमचा हक्क आहे आणि सरकार या अधिकाराचा आदर करेल, अशी मला आशा आहे.”

शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व आणि लडाखचा प्रश्न
सोनम वांगचुक यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या आकडेवारीवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “विविध परीक्षांमधील गोंधळामुळे आणि मानसिक तणावामुळे आतापर्यंत जवळपास २० निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पुढील वर्षी हा आकडा ४० किंवा ८० वर पोहोचू नये आणि अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती देशात पुन्हा कधीही होऊ नये, याच मुख्य उद्देशासाठी आम्ही इथे जीवाची बाजी लावून बसलो आहोत. शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणून जबाबदारी निश्चित करणे (Accountability) अत्यंत गरजेचे आहे.” याच संदर्भात त्यांनी लडाखच्या प्रलंबित प्रश्नांकडेही लक्ष वेधले. लडाख संदर्भातील चर्चेत बरीच प्रगती झाली असून, आता त्यावर अंतिम निर्णय घेण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन हीच सर्वात योग्य संधी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

“तरुणांमधील रोष टाळण्यासाठी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या”
देशातील तरुण वर्गामध्ये परीक्षांमधील गैरप्रकारामुळे केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे. हा राजकीय फटका टाळण्यासाठी आणि युवकांमध्ये सरकारची विश्वासार्हता पुन्हा निर्माण करण्यासाठी, संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच सरकारने शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, असा सल्ला वांगचुक यांनी दिला. तसे न झाल्यास, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पुढील काळात आंदोलनाची दिशा अधिक तीव्र करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

१३ दिवसांत साडेसात किलो वजन घटले; प्रकृती चिंताजनक
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे अधिकृत प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सोनम वांगचुक यांच्या खालावत्या प्रकृतीबाबत अत्यंत चिंताजनक माहिती दिली आहे. रांका यांनी सांगितले की, “गेल्या १३ दिवसांच्या निरंतर उपोषणामुळे वांगचुक यांचे वजन तब्बल ७.५ किलोने घटले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या