CBSE Board Big Error: सीबीएसई १२ वीचा निकाल लागल्यानंतर पुनर्मूल्यांकन (री-इव्हॅल्युएशन) प्रक्रियेत बोर्डाकडून एक गंभीर चूक झाली आहे. दोन विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या विषयांच्या उत्तरपत्रिका एकमेकांसोबत बदलल्या गेल्याचे समोर आले आहे.
वेदांत श्रीवास्तव नावाच्या एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे सीबीएसईचा हा ढिसाळ कारभार उघडकीस आला. यानंतर बोर्डाने आपली चूक मान्य करत दोन्ही विद्यार्थ्यांचे गुण पुन्हा बदलून देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
CBSE Board Big Error: दुसऱ्याचीच उत्तरपत्रिका विद्यार्थ्याच्या नावावर
वेदांतने जेव्हा सीबीएसईच्या ऑनलाईन प्रणालीवर आपली भौतिकशास्त्राची उत्तरपत्रिका तपासली, तेव्हा त्याला धक्काच बसला. ती उत्तरपत्रिका त्याची नव्हतीच, तर दुसऱ्याच कोणाची तरी होती.
वेदांतने या प्रकाराचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर शेअर केले. ही पोस्ट व्हायरल होताच सीबीएसई बोर्ड तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी थेट विद्यार्थ्याशी संपर्क साधला.
I am a CBSE Class 12 student.
— VEDANT (@VEDANTSHRIV17) May 23, 2026
After receiving unexpectedly low marks in Physics, we applied for photocopies of my answer sheets through the CBSE reevaluation process.
Today we received the copies.
And I am shattered because the Physics answer sheet uploaded by CBSE is not mine
CBSE Board Big Error: सीबीएसईने पाठवला ईमेल, गुण बदलणार
बोर्डाच्या संयुक्त सचिवांनी वेदांतला अधिकृत ईमेल पाठवून बोर्डाकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे.
- योग्य पेपर पाठवला: बोर्डाने वेदांतला त्याची मूळ आणि योग्य उत्तरपत्रिका ईमेलद्वारे पाठवून दिली आहे.
- निकालात बदल होणार: भौतिकशास्त्राच्या नवीन गुणांच्या आधारे वेदांतचा १२ वीचा निकाल लवकरच अपडेट केला जाईल, असे बोर्डाने सांगितले आहे.
CBSE Board Big Error: रसायनशास्त्राच्या पेपरमध्येही असाच घोळ
भौतिकशास्त्रासोबतच रसायनशास्त्राच्या (केमिस्ट्री) पेपरमध्येही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका दुसऱ्या विद्यार्थ्यानेही सोशल मीडियावर आपली उत्तरपत्रिका बदलल्याची तक्रार केली होती. सीबीएसईने ईमेलद्वारे या दुसऱ्या विद्यार्थ्याची तक्रारही योग्य असल्याचे मान्य केले आहे.
CBSE Board Big Error: डिजिटल पडताळणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
सीबीएसईने उत्तरपत्रिका तपासणी आणि पडताळणीसाठी नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकाच बदलल्या गेल्यामुळे या डिजिटल यंत्रणेवर आता मोठी टीका होत आहे. कारण अशा चुकांमुळे विद्यार्थ्यांचे गुण कमी होऊन त्यांचे कॉलेज प्रवेश रखडण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावरील तक्रारींचे निवारण करण्यासाठी सीबीएसईने आता एका विशेष टीमची नियुक्ती केली आहे.
हे देखील वाचा – LPG Cylinder New Rules: गॅस ग्राहकांसाठी नवीन नियम लागू! ‘या’ तारखेपर्यंत PNG न घेतल्यास LPG कनेक्शन होणार बंद











