Home / देश-विदेश / Jantar Mantar Protest: दिल्लीत तणाव कायम! पोलिसांचा लाठीमार आणि अश्रूधूर तरीही आंदोलक ठाम; आज पुन्हा संसदेवर धडकण्याचा इशारा

Jantar Mantar Protest: दिल्लीत तणाव कायम! पोलिसांचा लाठीमार आणि अश्रूधूर तरीही आंदोलक ठाम; आज पुन्हा संसदेवर धडकण्याचा इशारा

Chalo Sansad March Day 2: राजधानी दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या तीव्र चकमकींनंतरही आंदोलकांचा उत्साह कमी झालेला...

By: Team Navakal
Jantar Mantar Protest: दिल्लीत तणाव कायम! पोलिसांचा लाठीमार आणि अश्रूधूर तरीही आंदोलक ठाम; आज पुन्हा संसदेवर धडकण्याचा इशारा
Social + WhatsApp CTA

Chalo Sansad March Day 2: राजधानी दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या तीव्र चकमकींनंतरही आंदोलकांचा उत्साह कमी झालेला नाही. कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांनी सोमवारी रात्री उशिरा स्पष्ट केले की, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी संसदेवरील मार्च सुरूच राहील. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथील तात्पुरता मंच हटवल्यानंतर आंदोलकांनी पुन्हा तंबू ठोकून नवा मंच उभारला आहे.

पावसात भिजत अभिजित दिपके यांनी पक्षनेत्यांसह मानवी साखळी तयार केली आणि जोरदार घोषणाबाजी केली. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि NEET पेपर फुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलक 6 जूनपासून जंतरमंतरवर ठिय्या देऊन बसले आहेत.

या आंदोलनात उपोषणाला बसलेले शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आधीच सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

११८ हून अधिक पोलीस जखमी; पोलिसांनी दाखल केले अनेक गुन्हे

सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजारो तरुण आणि आंदोलक रस्त्यावर उतरले होते. या वेळी झालेल्या हिंसक चकमकीचे महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

  • लाठीमार आणि अश्रूधूर: आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
  • दगडफेक आणि जखमी: आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत 118 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. अनेक आंदोलकही या कारवाईत जखमी झाले आहेत.
  • सीसीटीव्ही फुटेजची तपासणी: या हिंसाचारामागे कोणता मोठा कट होता का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओंची बारकाईने पाहणी करून अनेक एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले आहेत.
  • इंटरनेट सेवा खंडित: सुरक्षेचा उपाय म्हणून जंतरमंतर आणि नवी दिल्लीच्या अनेक परिसरांमध्ये सोमवारी रात्री उशिरापर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

सरकारसोबत चर्चेची फेरी; जे. पी. नड्डा यांना 3 प्रमुख मागण्यांचे निवेदन

जंतरमंतरवर तणावाचे वातावरण असतानाच केंद्र सरकारने आंदोलकांशी संवादाचे मार्ग उघडे ठेवले आहेत:

  1. पहिली भेट (सकाळी 11:50): सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या वेळी नड्डा यांनी आंदोलकांना आपल्या मागण्या लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश दिले.
  2. दुसरी भेट (दुपारी 4:00): प्रतिनिधींनी पुन्हा नड्डा यांची भेट घेऊन 3 प्रमुख मागण्यांचे लेखी निवेदन सुपूर्द केले.
  3. चर्चेचा प्रस्ताव: सरकारने आंदोलकांना संप मागे घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ; पोलीस बंदोबस्त कडक

मंगळवारी पुन्हा मोर्चा काढण्याच्या घोषणेनंतर दिल्ली पोलिसांनी सुरक्षेची कडक तटबंदी उभारली आहे. जंतरमंतर परिसरात शेकडो पोलीस कर्मचारी आणि निमसैनिक दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या सब-इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कालप्रमाणेच कडक बंदोबस्त ठेवला जाईल आणि बॅरिकेड्स पुन्हा उभारले जातील. दिल्लीत गेल्या काही वर्षांत पाहिला मिळाला नाही असा मोठा रस्ता संघर्ष सोमवारी पाहायला मिळाला. आता मंगळवारी आंदोलक पुन्हा संसदेकडे निघाल्यास तणाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या