Home / महाराष्ट्र / Anna Hazare Hunger Strike : माहिती अधिकारातील नियमांवरून अण्णा हजारे आक्रमक! ‘या’ तारखेपासून उपोषणाला बसण्याचा इशारा

Anna Hazare Hunger Strike : माहिती अधिकारातील नियमांवरून अण्णा हजारे आक्रमक! ‘या’ तारखेपासून उपोषणाला बसण्याचा इशारा

Anna Hazare Hunger Strike : राज्यातील माहिती अधिकार कायद्यात (RTI) करण्यात आलेल्या नवीन बदलांमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी थेट...

By: Team Navakal
Anna Hazare Hunger Strike : माहिती अधिकारातील नियमांवरून अण्णा हजारे आक्रमक! 'या' तारखेपासून उपोषणाला बसण्याचा इशारा
Social + WhatsApp CTA

Anna Hazare Hunger Strike : राज्यातील माहिती अधिकार कायद्यात (RTI) करण्यात आलेल्या नवीन बदलांमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी थेट सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. फडणवीस सरकारने १२ जून २०२६ रोजी लागू केलेले नवीन नियम जर त्वरित मागे घेतले नाहीत, तर आगामी ५ जुलैपासून आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. हा बदल सामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप त्यांनी केला असून, सरकारला यासंबंधीचे पत्रही पाठवले आहे.

या संदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. पुढील दोन दिवसांत ते राळेगणसिद्धी येथे अण्णांची भेट घेणार आहेत. या बैठकीत जर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथील ऐतिहासिक यादवबाबा मंदिरात आपले बेमुदत उपोषण सुरू होईल, असे अण्णांनी स्पष्ट केले आहे.

माहिती अधिकारातील ‘ते’ नवीन बदल आणि अण्णांचा आक्षेप:

फडणवीस सरकारने माहिती अधिकार कायद्यात एकूण १२ नवीन नियम समाविष्ट केले आहेत, ज्याला अण्णा हजारे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे:

  • माहितीच्या प्रतीसाठी शुल्कवाढ: सर्वसामान्यांना माहिती मिळवण्यासाठी आता आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
  • ओळखपत्राची सक्ती: अर्ज करताना ओळखपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • एक विषय–एक अर्ज: नव्या नियमानुसार एका अर्जात केवळ एकाच विषयाची माहिती मागवता येईल.

या जाचक अटींमुळे माहितीचा अधिकार पूर्णपणे कमकुवत होईल आणि पारदर्शकता संपेल, असा दावा अण्णा हजारे यांनी केला आहे.

“ज्यांच्याकडे ध्येयवाद असतो, ते पक्ष बदलत नाहीत”; फुटीर खासदारांवर प्रहार

माहिती अधिकारासोबतच, राज्यातील चालू राजकीय घडामोडींवरही अण्णा हजारे यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील ६ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. या पक्षांतरावर अण्णांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

अशा प्रकारे वैयक्तिक स्वार्थासाठी वारंवार पक्ष बदलणे अत्यंत चुकीचे असून, यामध्ये कोणतीही श्रद्धा, निष्ठा किंवा ध्येयवाद उरलेला नाही, अशी टीका त्यांनी केली. ज्यांना प्रामाणिकपणे समाजासाठी काहीतरी करायचे असते, ते कधीही आपला पक्ष बदलत नाहीत; केवळ स्वतःचे हित पाहणारे लोकच पक्षांतर करतात, अशा कडक शब्दांत अण्णांनी बंडखोर खासदारांवर निशाणा साधला.

हे देखील वाचा – Kunal Shah WhatsApp Head: भारतीय उद्योजकाचा डंका! ‘CRED’ चे संस्थापक कुणाल शाह सांभाळणार व्हॉट्सअ‍ॅपची जागतिक धुरा

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या
Operation Tiger

Operation Tiger : मातोश्रीला पडलेल्या भगदाडावर एकनाथ शिंदेंची पहिली कडक प्रतिक्रिया!ते ६ टायगर शिवसेनेत आलेत, ना तुडवायला, ना आडवायला-आम्ही फक्त शिवसेना वाढवायला निघालोय’ म्हणत शिंदेनी टीकाकारांना सुनावले..