गोवा-मुंबई बस अपघात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कोल्हापूर

कोल्हापुरात आज मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी बसचा राधानगरी मार्गावर पुईखडीजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. नीलू गौतम (वय ४३), रिद्धिमा गौतम (वय १७) आणि सार्थक गौतम (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताच चौघेजण जखमी झाले. बसमध्ये २५ प्रवाशी होते. ही स्लीपर कोच बस गोव्यामधील पणजीमधून काल रात्री ८ वाजता मार्गस्थ झाली आणि आज पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top