अमरावती – राज्यासह देशातील प्रशासन आणि राजकारण निवडणुकीत मग्न आहे.मात्र अशा परिस्थितीत यंदाच्या मार्च महिन्यात राज्यात तब्बल ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे गेल्या २० वर्षांत अमरावती जिल्ह्यात याच मार्च महिन्यात सर्वाधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
यंदाच्या तीन महिन्यात तब्बल ८८ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी फक्त एका शेतकऱ्याला शासकीय मदत मिळाली आहे, यामध्ये ८१ प्रकरणे अजूनही चौकशीसाठी प्रलंबित आहे. यंदा जानेवारी महिन्यात २४, फेब्रुवारी २८ तर मार्च महिन्यात ३६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अमरावती जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ पासून आतापर्यंत तीन वेळा वादळासह अवकाळी पावसाने खरीप, रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. आता आठवडाभरापासून अवकाळीचे सत्र सुरू आहे.