बसचे ब्रेक फेल झाले तिघांचा चिरडून मृत्यू

विजयवाडा

विजयवाडा शहरातील पंडित नेहरू बस्थानकावर आंध्र प्रदेश परिवहन मंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. बस स्थानकामध्ये बसलेल्या प्रवाशांवर ही बस जाऊन धडकली. या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तींमध्ये एक महिला कंन्डक्टर आणि १० महिन्याच्या मुलीचा समावेश आहे. तर इतर काही प्रवासी जखमी झाले. बस स्थानकामधील १२ फलाटावर हा भीषण अपघात घडला. या अपघातामुळे ११ आणि १२ फलाटावरील फर्निचरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले. विजयवाडा येथील ऑटोनगर स्थाकातून बस गूंटूरला जात असताना हा अपघात घडला. या अपघातामध्ये गूंटूर आगारामधील वीराया या कंडक्टरचा मृत्यू झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top