ठाणे
मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगाव पुलावर कंटेनर बंद पडल्याने वाशिंद ते शहापूर येथील गोठेघरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे नाशिकहून ठाणे, मुंबईत येणाऱ्या वाहनचालकांचे हाल झाले. या कंटेनरला रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी आणखी ३ तास लागले.
नाशिक येथून सिमेंट वाहून नेणारा कंटेनर मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास भिवंडीच्या दिशेने जात होता. हा कंटेनर आसनगाव पुलाजवळ आला असताना बंद पडला. त्यामुळे वाशिंद ते गोठेघरपर्यंत दोन्ही दिशेकडे वाहनांच्या लांब रांगा लागल्या. त्यानंतर ठाणे ग्रामीण पोलिसांनी हा कंटेनर रस्त्यावरुन हटवला.