नवी दिल्ली – मच्छीमारी करताना पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेलेल्या ८० भारतीय मच्छिमारांची पाकिस्तान सरकारने सुटका केली आहे. या मच्छिमारांचे अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी स्वागत केले. पाकिस्तान सरकारच्या अवैध परदेशी स्थलांतरितांना आणि नागरिकांना देशातून बाहेर काढण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेंतर्गत भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली.
या भारतीय मच्छीमारांना अल्लामा इक्बाल एक्सप्रेस ट्रेनने कडक सुरक्षा व्यवस्थेत लाहोरला आणण्यात आले. त्यानंतर त्यांना अटारी-वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात सोपवले. पाकिस्तानातील ईधी वेल्फेअर ट्रक्टने वाघा सीमेवर मच्छीमारांना आणण्याची व्यवस्था केली. सुटका झालेल्या मच्छीमाराने सांगितले की, ‘मासेमारी करताना चूकून आम्ही पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. आम्ही सर्व जण ३ वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात होते.`