कराड- तालुक्यातील कराड- ढेबेवाडी रस्त्यावरील विंग गावच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानगव्यांचा वावर वाढत चालला आहे.हे रानगवे शेतातील पिकांचे मोठे नुकसान करत असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
विंग गावाजवळ असलेल्या विठ्ठलाई डोंगरपट्ट्यात रानगव्यांचा कळप फिरताना दिसत आहे.हा कळप शेतकर्यांच्या मका आणि उस पिकाला आपले लक्ष्य करत आहे. मध्यंतरी या कळपाने ज्वारी पिकांचे मोठे नुकसान केले होते.हेच रानगवे आता मका आणि उसाकडे वळत असल्याचे दिसत आहे. विंग परिसरात आधी मोकाट गायींचा त्रास सहन सरावा लागत होता. आता रानगव्यांचा कळपाने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे शेतकरी हतबलत बनले आहे.वन विभागाकडून या रानगव्यांचा कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी विंग ग्रामस्थ करत आहेत.