Home / महाराष्ट्र / Gold-Silver Rate : आर्थिक स्थैर्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय: सोन्या-चांदीच्या आयातशुल्कात १५ टक्क्यांपर्यंत वाढ; दरांमध्ये मोठी उसळी-चांदी तब्बल ३० हजारांनी महागली..

Gold-Silver Rate : आर्थिक स्थैर्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय: सोन्या-चांदीच्या आयातशुल्कात १५ टक्क्यांपर्यंत वाढ; दरांमध्ये मोठी उसळी-चांदी तब्बल ३० हजारांनी महागली..

Gold-Silver Rate : आखाती देशांमधील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट पसरले असून, याचे पडसाद आता भारताच्या बाजारपेठेतही उमटू...

By: Team Navakal
Gold-Silver Rate
Social + WhatsApp CTA

Gold-Silver Rate : आखाती देशांमधील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट पसरले असून, याचे पडसाद आता भारताच्या बाजारपेठेतही उमटू लागले आहेत. देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि परकीय चलन साठ्याचे जतन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. याच आवाहनापाठोपाठ केंद्र सरकारने एक धाडसी पाऊल उचलत सोने आणि चांदीवरील आयातशुल्कात (Import Duty) मोठी वाढ केली आहे.

आयातशुल्कातील वाढ आणि सराफा बाजारातील स्थिती:
केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयातशुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. हे नवे दर आजपासूनच लागू करण्यात आले आहेत. या निर्णयाचा तात्काळ परिणाम सराफा बाजारावर दिसून आला असून मौल्यवान धातूंच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला आहे.

सोन्याचे दर: काल (१२ मे) प्रति तोळा १,५१,००० रुपये असलेले सोन्याचे दर आज ११,००० रुपयांनी वधारून १,६२,००० रुपयांवर पोहोचले आहेत.

चांदीचे दर: चांदीच्या दरात तर ऐतिहासिक वाढ झाली असून, ३०,००० रुपयांच्या वाढीसह चांदी आता २,९८,००० रुपये प्रति किलो या स्तरावर पोहोचली आहे.

पंतप्रधानांच्या आवाहनामागील भूमिका आणि अर्थशास्त्र:
पंतप्रधानांनी देशवासियांना पुढील वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे आणि पेट्रोल-डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनामागे ‘परकीय चलन साठा’ (Dollar Reserves) सुरक्षित ठेवण्याचे मोठे उद्दिष्ट आहे. भारत जेव्हा तेल, वायू, खते किंवा सोन्याची आयात करतो, तेव्हा त्याचे मूल्य अमेरिकन डॉलरमध्ये अदा करावे लागते. जागतिक संकटामुळे वस्तूंच्या किमती वाढल्याने डॉलरचा साठा वेगाने खर्च होत असून रुपयाची स्थिती कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा दबाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, वाढीव १५ टक्के आयातशुल्कापैकी ५ टक्के रक्कम ही कृषी आणि विकासकामांसाठी खर्च केली जाणार आहे.

जनतेसाठी सात सूत्री ‘सावधगिरीचा’ मंत्र:
देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठी पंतप्रधानांनी नागरिकांना खालील सात महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:
१. सुवर्ण खरेदीला लगाम: अनावश्यक सोने खरेदी पूर्णपणे टाळावी.
२. इंधन बचत: पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करावा.
३. वर्क फ्रॉम होम: प्रवास टाळण्यासाठी घरून काम करण्याच्या संस्कृतीला प्राधान्य द्यावे.
४. परदेश प्रवास टाळणे: परकीय चलनाचा ओघ थांबवण्यासाठी परदेश दौरे टाळावेत.
५. खाद्यतेल वापर: खाद्यतेलाच्या आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी त्याचा वापर संतुलित ठेवावा.
६. नैसर्गिक शेती: रासायनिक खतांची आयात कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळावे.
७. स्वदेशीचा पुरस्कार: केवळ भारतीय बनावटीच्या उत्पादनांचा वापर करून अर्थव्यवस्थेला बळकटी द्यावी.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या