Home / देश-विदेश / West Bengal Politics: ममता बॅनर्जींचा मोठा पवित्रा; निवडणुकीच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात देणार आव्हान! राज्यभर वाजणार ‘रवींद्र संगीत’

West Bengal Politics: ममता बॅनर्जींचा मोठा पवित्रा; निवडणुकीच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात देणार आव्हान! राज्यभर वाजणार ‘रवींद्र संगीत’

West Bengal Politics: पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व संघर्ष पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २०० पेक्षा जास्त...

By: Team Navakal
West Bengal Politics
Social + WhatsApp CTA

West Bengal Politics: पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व संघर्ष पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २०० पेक्षा जास्त जागा जिंकून बहुमत मिळवले असले, तरी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी हा कौल स्वीकारण्यास नकार दिला आहे. कोलकात्यातील त्यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी झालेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांनी या निकालाला थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान देण्याची घोषणा केली आहे.

निवडणुकीच्या निकालावर गंभीर आरोप

ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. “हा लोकशाहीचा विजय नसून बळजबरीने चोरलेला कौल आहे,” असे म्हणत त्यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा केला आहे. या कायदेशीर लढाईसाठी त्यांनी स्वतः आणि माजी आरोग्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य पुन्हा वकिली सुरू करणार असल्याचेही संकेत दिले आहेत.

राजीनाम्यास स्पष्ट नकार आणि निषेध

ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे. राजीनामा न देणे हा आपला लोकशाहीतील निषेध नोंदवण्याचा एक मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच सुरात सूर मिसळत अभिषेक बॅनर्जी यांनीही पक्षाच्या नेत्यांना आपल्या पदांचे राजीनामे न देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधातही पक्ष कायदेशीर मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

९ मे रोजी ‘रवींद्र संगीत’ वाजवण्याचे आदेश

ज्या दिवशी कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल, म्हणजेच ९ मे रोजी, त्या दिवशी राज्यातील तृणमूल काँग्रेसच्या सर्व पक्ष कार्यालयांमध्ये ‘रवींद्र संगीत’ (रवींद्रनाथ टागोर यांची गाणी) वाजवण्याचे आदेश ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. हा एक प्रकारचा शांततापूर्ण निषेध असल्याचे मानले जात आहे.

दिल्लीतील ‘इंडिया’ आघाडीवर लक्ष

बंगालमधील या धक्क्यातून सावरत असतानाच, ममता बॅनर्जी यांनी आपले लक्ष दिल्लीतील ‘इंडिया’ (INDIA) आघाडीवर केंद्रित केले आहे. विरोधकांची ताकद एकवटण्यासाठी त्या प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. तसेच, “केंद्राला हवे असल्यास ते राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात, पण ते अधिकृत रेकॉर्डवर येऊ द्या,” असे आव्हानही त्यांनी केंद्र सरकारला दिले आहे.

बैठकीच्या शेवटी त्यांनी सर्व विजयी उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात राहून सामान्य लोकांशी संपर्क वाढवण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.

हे देखील वाचा – West Bengal Violence: भाजप नेते शुभेंदु अधिकारींच्या खासगी सचिवावर भीषण गोळीबार; भररस्त्यात हत्या, बंगालमध्ये तणाव

Web Title:
संबंधित बातम्या