मुंबई- उत्तरेकडून गरम वारे वाहू लागल्याने उद्या बुधवार २० मार्चपासून तीन दिवस मुंबईच्या तापमानात मोठी वाढ होणार आहे. मुंबईसह ठाणे परिसरातील तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत झेपावण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.
या आठवड्यात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवसांत विशेषतः मुंबई उपनगरातील तापमान कमालीचे वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी १२ ते सायंकाळी ४ यावेळेत गरज असेल तरच घराबाहेर पडावे,असे आवाहन मुंबईकरांसह ठाणेकरांना कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी केले आहे.दरम्यान,या वाढत्या तापमानामुळे राणी बागेतील पशुपक्ष्यांना कलिंगड,चिकू,थंडगार ऊस,
आईस फ्रूट,बर्फाचा गोळा, काकडी,मोसंबी आणि हिरव्या भाज्या दिल्या जात आहेत