दिसपूर – देशातील इतर राज्यांप्रमाणे आसाममध्येही लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय प्रचाळाची रणधुमाळी सुरू आहे.मात्र त्यातच राज्यातील सोनितपूर जिल्ह्यातील फुलोगुरी नेपाळी पाम गावातील दिवंगत रॉन बहादूर थापा यांचे कुटुंब देशभरात चर्चेत आले आहे.या कुटुंबाचे वैशिष्ट्य असे की, या कुटुंबात दहा, वीस नव्हे तर तब्बल ३५० मतदार आहेत.
संपूर्ण आसाम राज्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेले कुटुंब म्हणून या थापा कुटुंबाचा दबदबा आहे. दिवंगत रॉन बहादूर थापा यांच्या पश्चाताप १२ मुले ,९ मुली आणि १५० हून अधिक नातवंडे आहेत.थापा यांना पाच पत्नी होत्या.आता त्यांच्या कुटुंबातील सुमारे ३५० सदस्य १९ एप्रिल रोजी होणार्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बनवणार आहेत.