मुंबई :
मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला निघालेल्या इंडिगो विमान कंपनीच्या विमानाचे पार्किंग ब्रेक फेल झाल्याने उड्डाण करणारे विमान ऐनवेळी थांबविण्यात आले आणि पुढचा अनर्थ टळला. काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. विमानाचे उड्डाण झाले असते, तर मोठी दुर्घटना घडली असती. विमानात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी निघाले होते. १५० प्रवासी घेऊन हे विमान छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी धावपट्टीवरून उडण्यासाठी तयार होत असतानाच त्याचे टायर फुटले. टायर बदलून पुन्हा उडण्यासाठी ते सज्ज झाले. मात्र उड्डाण करण्याच्या आधीच विमानाचे पार्किंग ब्रेक फेल झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. वैमानिकाने आवश्यक त्या सूचना प्रवाशांना देण्याचे सांगून विमान थांबवले. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.