देहरादून
उत्तराखंडच्या बागेश्वरमधील चिदांग येथे आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमरास एक गाडी नदीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघतात गाडीमधील चौघांचा मृत्यू झाला. कमल प्रसाद (२६), नीरज कुमार (२५) ,कैलाश राम (२५) आणि दीपक आर्य (२२) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व तरूण बागेश्वर येथून सरयू नदीचे पाणी घेण्यासाठी जात होते. यावेळी चिदांग येथे त्यांची गाडी आली असता अपघात झाला आणि गाडी नदीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह नदीतून बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.