मोरादाबाद- लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत आज गृहमंत्री अमित शाह यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार टिका केली. मी जेव्हा २०१३ साली उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात आलो होतो तेंव्हा सगळीकडे दंगली सुरु होत्या, भयाचे वातावरण होते, गाईंची तस्करी होत होती. या ठिकाणी गुंडांची सत्ता होती. त्यानंतर आमची सत्ता आल्यावरच विकास सुरु झाला असा घणाघात अमित शाह यांनी केला. समाजवादी पार्टी च्या काळात गुंडांचे राज्य होते असेही ते म्हणाले. आज मोरादाबाद इथं भाजपा उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलतांना त्यांनी सांगितले की, भाजपाच्या एक जिल्हा एक उत्पादन या योजनेमुळे राज्यात विकासाचा वेग प्रचंड वाढला. उत्तर प्रदेशच्या कैराना भागातून हिंदू मोठ्या प्रमाणात स्थालांतरीत होत होते. योगी आदित्यनाथांचे सरकार आल्यापासून इथून आता हिंदूंचे नव्हे तर गुंडाचे स्थलांतर सुरु झाले आहे. योगी आदित्यनाथांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आणले. गृहमंत्री अमित शाहांनी आज उत्तर प्रदेशात भाजपा उमेदवाराच्या प्रचारात भाग घेतला.