दिल्ली –
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अवीवदरम्यानची विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे. दिल्ली आणि तेल अवीवदरम्यान दर आठवड्याला चार विमाने चालवण्यात येतात, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.
एअर इंडियाने इस्रायल-हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यावर ७ ऑक्टोबर रोजी भारत ते तेल अवीव ही उड्डाण सेवा रद्द केली होती. वातावरण निवळल्यानतंर ४ मार्च रोजी एअर इंडियाने ही सेवा पुन्हा सुरू केली. मात्र आता पुन्हा ही विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे.