कल्याण
कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या बारावे, मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल आणि दुरुस्तीचे काम करायचे असल्याने मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत कल्याण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी सांगितले. पाणीपुरवठा बंदचा कल्याण पूर्व, पश्चिम भाग, कल्याण ग्रामीण मधील टिटवाळा, आंबिवली, वडवली, शहाड, अटाळी परिसरावर परिणाम होणार आहे. मंगळवारी दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी या भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणी साठा घरात करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, अशी सूचना पालिकेने केली आहे.