पटना :
बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ वर वऱ्हाडाची कार आणि ट्रॅक्टरची भीषण धडक झाली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
थुट्टी मोहनपूर इथले लग्न उरकून हे वऱ्हाड मडैया बिथाला गावाकडे परत येत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ वर विद्यारतन पेट्रोल पंपाजवळ वऱ्हाडांची कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात वऱ्हाडांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या वऱ्हाड्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. गोगरीचे पोलीस अधीक्षक रमेश कुमार यांनी सांगितले की, या अपघातात तीन मुलांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. हे नागरिक लग्न समारंभातून मडैया बिथाला गावाकडे परत जात होते.