श्रीनगर
जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आले. कालपासून सामनू गावात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू होता. काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यांच्या शोधासाठी ऑपरेशन काली हाती घेण्यात आले होते.कुलगाम पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी या मोहिमेत भाग घेतला होता.
गेल्या २ दिवसांत ७ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. बारामुल्लातही काल २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर कुलगामात सुरू असलेल्या चकमकीत काल ३ आणि आज आणखी २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दरम्यान, ठार केलेल्या दहशदवाद्यांकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे.