गुरुवार- शुक्रवार १८ तास धारावी, वांद्रेत पाणीबंदी !

मुंबई – मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड समोर जलवाहिनी जल जोडणीच्या कामासाठी येत्या गुरुवार १८ व शुक्रवार १९ एप्रिल रोजी काही भागात १०० टक्के, तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे.त्यामुळे पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

धारावी नवरंग कम्पाउंड येथे २४०० मिली मीटर व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी व ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीच्या जोडणीचे काम १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून १९ एप्रिल पहाटे ४ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण १८ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे.या कालावधीत काही भागात १०० टक्के, तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे.दरम्यान,या कालावधीत एच पूर्व विभाग – वांद्रे रेल्वे टर्मिनस व वांद्रे स्थानक परिसर,जी उत्तर – धारावी लूप मार्ग, नाईक नगर,प्रेम नगर येथील १८ एप्रिल रोजी सकाळचा पाणीपुरवठा,जी उत्तर – धारावी लूप मार्ग, गणेश मंदीर मार्ग,दिलीप कदम मार्ग,माहीम फाटक मार्ग येथील सकाळचा पाणीपुरवठा १०० टक्के बंद राहणार आहे.तर जी उत्तर- ६० फुटी रोड, शीव-माहीम लिंक रोड,९० फुटी रोड, महात्मा गांधी मार्ग,संत कक्कया मार्ग,ए.के.जी. नगर,एम.पी.नगर येथील सकाळचा पाणीपुरवठा २५ टक्के बंद राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top