मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून राजकीय पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू असताना वऱळीतील ३०० ठिकाणांवर आमचे नशीब आम्हीच बदलणार, दक्षिण मुंबईत यंदा बदल घडवणारच असे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर आम्ही वरळीकर या नावाने लावण्यात आले असून या बॅनरबाजीमुळे वरळीतील राजकीय वातावरण तापले आहे. या बॅनरमधून ठाकरे गटावर भाजपने अप्रत्यक्ष निशाणा साधला असल्याची जोरदार चर्चा आहे