प्रसिद्ध दाजीपूर अभयारण्य ३० आणि ३१ डिसेंबर रोजी बंद

कोल्हापूर

राधानगरी तालुक्यातील प्रसिध्द दाजीपूर अभयारण्य ३० आणि ३१ डिसेंबर या २ दिवसांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती दाजीपूर वन्यजीव विभागाने दिली आहे. दाजीपूर अभयारण्यामध्ये पट्टेरी वाघ, गवा, रेडा असे प्राणी असल्याने महाराष्ट्रातील अनेक पर्यटक येथे येतात. वर्षाअखेरीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनस्थळावर दाखल होत पार्ट्या करतात. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत त्यांचा धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे पर्यटनस्थळावर काचा आणि प्लास्टिकचा कचरा होतो.

काहीवेळा सुकलेल्या गवताला आग लागण्याची शक्यताही अधिक असते. त्यामुळे जंगलाचे व वन्य जीवांचे नुकसान होऊ शकते. शिवाय काचांमुळे वन्यप्राण्यांना नाहक त्रास होतो. याच पार्श्वभूमीवर दाजीपूर वन्यजीव विभागाने हा निर्णय घेतला आहे. पर्यटक या अभयारण्यामध्ये या दिवसांमध्ये सापडल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील प्रशासनाने दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top