बाबा बालकनाथांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला?

जयपूर- भाजपच्या राजस्थानमधील दमदार यशानंतर राजस्थानचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण यावरुन चांगली चर्चा रंगली आहे.त्यातील निकालाच्या दिवसापासूनच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अग्रभागी असलेले बाबा बालकनाथ यांनी मात्र आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नसल्याचे संकेत दिले आहेत.यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर स्वत:हुन एक ट्वीट केले आहे.
बाबा बालकनाथ यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मला पहिल्यांदाच खासदार आणि आमदार होऊन देशसेवा करण्याची संधी जनतेने दिली आहे.पण निवडणूक निकाल आल्यानंतर मीडिया आणि सोशल मीडियावर जी चर्चा सुरू झाली आहे,त्याकडे लोकांनी दुर्लक्ष करावे. कारण मला अजूनही पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घ्यायचा आहे.
बाबा बालकनाथ २०१९ साली भाजपच्या तिकीटावर अलवर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर राजस्थानच्या तिजारा मतदार संघातून विजयी झाले.या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार इम्रान खान यांना पराभव करुन विजय मिळवला आहे. विधानसभेला विजयी झाल्यानंतर बाबा बालकानाथ यांनी आपल्या खासदारकीचा राजीमाना दिला.यानंतर त्यांचे नाव राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत चर्चेत आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top