काठमांडू : नेपाळ सरकारने १९ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांपूर्वी भारत-नेपाळ सीमा ७२ तासांसाठी सील करण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाने केलेल्या शिफारशीनंतर सरकारने आज सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १९ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. भारत-नेपाळ समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजकंटक किंवा विध्वंसक घटकांना सीमा ओलांडून निवडणुकीत अडथळा होऊ नये, म्हणून सीमेवर आणि दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांनी संयुक्तपणे गस्त घालण्याचा निर्णय घेतला.