मुंबई – शनिवार १४ ऑक्टोबर रोजी होणार्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक क्रिकेट सामन्यासाठी मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान दोन विशेष सुपर फास्ट ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
क्रिकेट सामन्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता ही विशेष ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटेल आणि दुसर्या दिवशी १४ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता अहमदाबादला पोहचेल. त्यानंतर ही ट्रेन १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादहून पहाटे ४ वाजता सुटेल आणि दुपारी १२.१० वाजता मुंबईला पोहचेल.ही विशेष ट्रेन येताना अणि जाताना दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत अणि वडोदरा या प्रमुख स्थानकांवर थांबेल .