मॉर्निंग वॉकला जाणे टाळा, मास्क लावा प्रदुषणामुळे आरोग्य विभागाचा सल्ला

मुंबई

गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. धूलिकण वाढल्याने आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. मॉर्निंगवॉक आणि संध्याकाळी घराबाहेर चालणे टाळा, सकाळी आणि संध्याकाळी घराचे दरवाजे खिडक्या उघडू नका, लाकूड, कोळसा आणि अन्य ज्वलनशील गोष्टी जाळणे टाळा, दिवाळीत फटाके फोडणे टाळा, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे अशी नियमावली आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. काळ आणि संध्याकाळ ऐवजी नारगरिकांनी दुपारी १२ ते ४ बाहेर पडावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. प्रदूषण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. राज्यातील १७ मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे, त्यामुळे आरोग्य विभागाने या सूचना दिल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top