राज्यसभेत यापुढे नमाजासाठी सुट्टी नाही! सभापती धनखड यांचा निर्णय

नवी दिल्ली- संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत दर शुक्रवारी नमाजासाठी दिली जाणारी अर्ध्या तासाची सुट्टी आता रद्द करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी हा निर्णय घेतला. यासंबंधीच्या नियमात बदल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आतापर्यंत राज्यसभेत दुपारच्या जेवणाची वेळ दर शुक्रवारी १ ते २:३० अशी होती. त्याचवेळी लोकसभेत दुपारच्या जेवणाचा वेळ दुपारी १ ते २ पर्यंत असते. हा अतिरिक्त अर्धा तास राज्यसभेत नमाजासाठी देण्यात येते होता. या संदर्भात निर्णय कधी घेण्यात आला, सभागृहातील सदस्यांना याची माहिती नाही, हा बदल का झाला, असे प्रश्न काही सदस्यांनी केले. त्यावर सभापती धनखड यांनी सांगितले की, हा बदल आधीच केला आहे. लोकसभेचे कामकाज २ वाजता सुरू होते. लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही संसदेचा भाग आहेत. दोन्ही सभागृहाच्या कामाच्या वेळेत समानता असावी, यासाठी आधीच नियमावली बनवली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top