राज्यात उष्णतेची लाट येणार थंड पाणी न पिण्याचा सल्ला!

मुंबई

देशभरात उन्हाळा वाढत असून पुढील काही दिवसात ४० ते ५० अंश सेल्सियस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी पिणे टाळावे आणि साधे पाणी प्यावे असा सल्ला आयोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, सध्या मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि इतर देश उष्णतेची लाट अनुभवत आहेत.

तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावर खूप थंड पाणी न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात, कारण असे केल्यास आपल्या लहान रक्तवाहिन्या फुटण्याची किंवा रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच हात, पाय धुवू नका. त्याआधी किंवा आंघोळ करण्याआधी किमान अर्धा तास थांबा. त्यानंतरच अंघोळ करा, असे न केल्यास त्या व्यक्तीला स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते, असेही आयोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top