लोक कसा रेल्वेप्रवास करतात बघा! राहुल गांधींनी टाकला गर्दीचा व्हिडीओ

वायनाड
काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी आज समाजमाध्यमावर केरळ एक्सप्रेसमधील एसी कोचच्या गर्दीचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकला आहे. या व्हिडिओत काही प्रवासी शौचालयात बसलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ टाकून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भारतीय रेल्वेला कमजोर करुन ती त्यांच्या मित्रांना विकण्याचे मोदी सरकारचे धोरण आहे असे त्यांनी एक्सवर म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर दिल्ली ते तिरुवनंतपुरम चालणाऱ्या केरळ एक्सप्रेसच्या एसी डब्याचे फोटो टाकले आहेत. त्यांनी एक्सवर म्हटले आहे की, मोदींच्या राज्यात रेल्वेतून प्रवास करणे शिक्षा भोगण्यासारखे आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीचे जनरल डबे कमी करुन केवळ श्रीमंत लोकांसाठीच्या गाड्यांचा प्रचार केला जात आहे. मोदी सरकारमुळे सर्व वर्गाचे प्रवासी त्रास सहन करत आहेत. लोकांना कन्फर्म सिटवरही प्रवास करता येत नाही. मोदी सरकार रेल्वेला कमजोर करत असून त्यानंतर त्यांना ही रेल्वे आपल्या मित्रांना विकायला कारणच मिळेल. सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन वाचवायचे असेल तर रेल्वेला बरबाद करण्यात गुंतलेल्या मोदी सरकारला हटवायला हवे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top