मुंबई – मुंबईच्या -राजीव गांधी वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल शुल्कात सोमवार १ एप्रिलपासून १८ टक्के शुल्कवाढ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कार व जीपसाठी वन वे ट्रिपचे दर १०० रुपये, मिनी बस टेम्पो आणि तत्सम वाहनांसाठी १६० रुपये, दोन एक्सल ट्रकला २१० रुपये अशी ही दरवाढ असेल. हे सुधारित दर १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी आहेत. टोल आगाऊ भरल्यास वाहनचालकांना १० ते २० टक्के सवलत मिळू शकेल.