शाळा बुडवून मुलांची पाण्यासाठी पायपीट

नाशिक – इगतपुरी तालुक्यात अनेक छोटी-मोठी धरणे आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इगतपुरी तालुक्यात होतो. मात्र याच इगतपुरीत वाकी खापरी अतिदुर्गम भागातील खडकवींडी येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट सुरु आहे. पाण्यासाठी खडकवाडी भागातील महिला, पुरुषांना कामाचा खाडा करून तसेच लहान मुलांची शाळा बुडवून डोक्यावर कापड घेत पाण्यासाठी पायपीट करत आहेत.
शिक्षण घ्यायच्या वयात मुलांना पाण्यासाठी डोंगरदऱ्या, जंगल खोऱ्यातून पायपीट करावी लागत आहे. पाण्यासाठी जिवावर उदार होऊन ६ ते ७ किलोमीटर रणरणत्या आग ओकणाऱ्या लहानशा पाणी साचलेल्या डबक्यापाशी येऊन त्यांची पायपीट थांबते. जनावरेही पिणार नाही असे गढूळ आणि जंतू असलेले पाणी या बांधवांना आपल्या रिकाम्या घागरीत घेऊन तहान भागविण्याची वेळ आली आहे.
पाण्यासाठी आदिवासी बांधवांच्या डोळ्यात पाणी येते आहे. या योजनेच्या कामाची चौकशी केली नाही, तर येत्या आदिवासी समाज मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांनी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top