कराड –
साताऱ्यासह कोयना धरण परिसरात रात्री पावणेबाराच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. कोयना सिंचन विभागाने ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती दिली. या धक्क्यामुळे कोणतीही जीवितकिंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २४ किलोमीटर वारणा खोर्यात चांदोली गावाजवळ होता. या भूकंपाचे हादरे कोयनानगर परिसरात जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नाही. तसेच लोकांनी भीती बाळगू नये, असे प्रशासनाने सांगितले आहे. साताऱ्यातही रात्री ११ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. हा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. मागील काही दिवसांत उत्तर भारतदेखील भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहे.