परभणी- राज्यात पुढील दहा दिवस थंडीचे असणार आहेत.ही थंडी पिकांसाठी पोषक राहणार असून उद्या ३१ ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि कोकण, कर्नाटकात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी म्हटले आहे की,उद्या मंगळवारी सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी,सावंतवाडी आणि कर्नाटकातील निपाणी भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उद्यापासून पुढील दहा दिवस राज्यात थंडी पडण्याची शक्यता आहे. थंडीत येणार्या
पिकांसाठी आणि गहू पेरणीसाठी हे वातावरण पोषक राहणार आहे.