Central Railway Summer Special: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. हीच वाढती मागणी आणि रेल्वे गाड्यांमधील गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. मुंबई आणि पुणे या शहरांमधून विविध राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त १६८ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Central Railway Summer Special Train: महत्त्वाच्या रेल्वे फेऱ्या आणि मार्ग
या विशेष गाड्यांमुळे मुंबई आणि पुणे ही शहरे चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, बनारस, संत्रागाची आणि गाझीपूर सिटी या महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडली जाणार आहेत.
१. मुंबई ते चेन्नई (साप्ताहिक विशेष): गाडी क्रमांक ०१०१५ ही १९ एप्रिल ते ७ जून दरम्यान दर रविवारी CSMT वरून दुपारी १२:२० वाजता सुटेल. परतीचा प्रवास (गाडी क्र. ०१०१६) २० एप्रिल ते ८ जून दरम्यान दर सोमवारी चेन्नईवरून सायंकाळी ४:०० वाजता सुरू होईल.
२. मुंबई ते हैदराबाद (साप्ताहिक विशेष): CSMT-हैदराबाद ही गाडी २३ एप्रिल ते ९ जुलै दरम्यान दर गुरुवारी धावेल. ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, नांदेड आणि सिकंदराबाद मार्गे जाईल.
३. मुंबई ते बंगळुरू (साप्ताहिक विशेष): LTT-बंगळुरू गाडी (क्र. ०१०१३) १९ एप्रिल ते १२ जुलै या काळात दर रविवारी सुटेल. ही गाडी सातारा, सांगली, मिरज आणि बेळगावी मार्गे प्रवास करेल.
Central Railway Summer Special Train: शिक्षकांसाठी ‘टीचर्स स्पेशल’ ट्रेन
शिक्षकांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते बनारस दरम्यान विशेष गाडी चालवणार आहे.
- LTT ते बनारस (गाडी क्र. ०११२५): ६ मे रोजी रवाना होईल.
- बनारस ते LTT (गाडी क्र. ०११२६): १२ जून रोजी परतीच्या प्रवासाला निघेल.
पुणेकरांसाठी विशेष सुविधा
पुण्याहून संत्रागाची आणि गाझीपूर सिटीसाठी विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे-गाझीपूर सिटी (०१४३१) ही गाडी १ मे ते १४ जुलै दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी धावेल.
आरक्षण कधीपासून?
प्रवाशांनी नोंद घ्यावी की, बहुतेक विशेष गाड्यांसाठी (०१०१५, ०१०११, ०११२७ इ.) तिकीट आरक्षणाला १५ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. प्रवासी आपले तिकीट आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर किंवा आरक्षण खिडकीवर बुक करू शकतात. ‘टीचर्स स्पेशल’ गाडीच्या आरक्षणाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
हे देखील वाचा – Modi-Trump Call: मोदी-ट्रम्प यांच्यात 40 मिनिटे खलबतं! ‘या’ महत्त्वाच्या मुद्यांवर झाली चर्चा











