Suryakumar Yadav India T20 Captain: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीम इंडियाच्या भविष्यासाठी मोठी रणनीती आखत आहे. रिपोर्टनुसार, गंभीरने २०२८ च्या टी२० वर्ल्ड कपपर्यंत आपला कार्यकाळ वाढवण्याची इच्छा व्यक्त केली असून, या कालावधीत सूर्यकुमार यादवच टी२० फॉरमॅटमध्ये त्यांचा पसंतीचा कर्णधार राहणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सूर्याच्या फलंदाजीतील फॉर्मबद्दल चर्चा सुरू असली, तरी गंभीरचा त्याच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे.
India T20 Captain: फॉर्मची चिंता, पण गंभीरचा पाठिंबा
नुकत्याच झालेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले, मात्र वैयक्तिक कामगिरीत तो काहीसा मागे पडलेला दिसला. स्पर्धेत त्याने 242 धावा केल्या, ज्यात अमेरिकेविरुद्धच्या 84 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
सुरू असलेल्या आयपीएल 2026 मध्येही मुंबई इंडियन्ससाठी खेळताना आतापर्यंत ४ सामन्यात त्याने केवळ 106 धावा केल्या आहेत. असे असूनही, गंभीरला वाटते की सूर्यामध्ये संघाला पुढे नेण्याची क्षमता आहे.
India T20 Captain: इंग्लंड आणि आयर्लंड दौरा ठरणार निर्णायक
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचा आगामी इंग्लंड आणि आयर्लंड दौरा सूर्यकुमारसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. या दौऱ्यातील त्याची वैयक्तिक कामगिरी आणि नेतृत्व हेच ठरवेल की तो २०२८ चा वर्ल्ड कप आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल की नाही. निवड समितीने स्पष्ट केले आहे की, नेतृत्व कायम ठेवण्यासाठी फलंदाज म्हणून सातत्य राखणे अनिवार्य असेल.
India T20 Captain: गंभीरचा २०२८ पर्यंतचा मास्टर प्लॅन
गौतम गंभीरचा सध्याचा करार २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत आहे. मात्र,आपला कार्यकाळ २०२८ पर्यंत वाढवण्यास उत्सुक असून, त्याला सूर्यकुमारसोबतच आपली पुढील योजना पूर्ण करायची आहे. गंभीरची ही भूमिका सूर्यासाठी मोठा दिलासा मानली जात आहे, कारण प्रशिक्षकाचा पाठिंबा असल्यास खेळाडूला आपला नैसर्गिक खेळ खेळण्यास मदत होते.
हे देखील वाचा –
Modi-Trump Call: मोदी-ट्रम्प यांच्यात 40 मिनिटे खलबतं! ‘या’ महत्त्वाच्या मुद्यांवर झाली चर्चा











